जालना शहरातील सर्व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी यांच्या साठी महानगरपालिकेने स्कूल बस सेवा सुरु करा – सुशील वाघमारे
जालना (दिनांक ०४/०६/२०२६ ) रिपब्लिकन बहुजन सेने तर्फे महानगरपालिकेचे उपायुक श्री. कांबळे निवदेन देण्यात आले कि , जालना शहर नगरपालिकेत पूर्वी २० शाळा होत्या आज त्या शाळा फक्त १६ शाळा राहिल्या आहेत आणि विद्यार्थी संख्या कमी होत आहे, महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारे विध्यार्थी हे मध्यम वर्ग , तसेच सामान्य वर्गाचे मुल मुली असतात त्या विद्यार्थीयांचे पालक ,आई कामाला जातात मोल मजुरी, मिस्त्री, बिगारी, आई कोणाच्या घरी धुणे भांडे करयाला जाणारे असतात, त्यामुळे त्यांच्या कडे गाडी, टू व्हीलर नसते , महानगरपालीकेने जर स्कूल बस सुरु केली तर नकीच सामान्य विद्यार्थी यांना हि आपण शिक्षण प्रवाहत आणू शकतो ,
एकी कडे स्वच्छा या विषयी हजारो करोड रु महानगरपालिका खर्च करते , घंटा गाडी, ट्रक्टर नव नवीन गाडी,पेट्रोल, डीजेल, ट्रक्टर, तर मंग शिक्षणासाठी का महानगरपालिका खर्च करत नाही ?
कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहे , आणि ज्या प्रमाणे जालना स्टील आणि सीड साठी जालना प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे भारतात सर्वात कमी वयात म्हणजे २१ व्या वर्षी यु.पी.एस.सी पासून होऊन जिल्हाधिकारी होणारे अन्सार शेख हि जालना जिल्हातील आहेत आणि ते हि शेलगाव बदनापूर जिल्हापरिषद शाळेतील येथील विध्यार्थी होते, सांगण्याचे कारण कि महानगरपालीकेचे विद्यार्थी यांना स्कूल बस सुरु केली तर विद्यार्थी संख्या हि वाढेल आणि देशाला चांगले विध्यार्थी हि भेटतील ,
या करिता जालना शहरातील सर्व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शाळेत आणून सोडणे व वापस घरी सोडणे यांच्या साठी महानगरपालिकेने स्कूल बस सेवा सूरु करून सामन्य कुटुंबाना न्याय देण्यात यावा अशा मागणीचे चे निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन बहुजन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुशील वाघमारे , सरचिटनिस करीमलाला, संघटक दावीद कसबे, शहर अध्यक्ष सोहेल पठाण उपस्थित होते